बुधवार, २५ जानेवारी, २०१२

जाना था जापान , पहोच गए चीन !!

हाश !! संपली मुलांची परीक्षा. कालच बारावी च्या मुलांची  कम्प्युटर विषयाची परीक्षा संपली. दोन दिवस चालली. गुण देण्यासाठी सकाळ पासून दुपारचे बारा वाजेपर्यंत एका लेब मधून दुसर्या लेब मधेय चकरा मारत होतो. आता थोडा विसावा मिळाला आहे.तरी अधून मधून मेनेजमेंट मुलाकडून प्रोजेक्ट तयार करवून घेण्यासाठी रोज रोज टोमणा मारत आहेत. कॉम्प्युटर चा हेड फोनमध्ये बिघाड झाला आहे. त्याला सर्विस सेन्टर वर घेवून जावयाचे आहे. मित्राचे जुने कॉम्प्युटर घरी आणून ठेवले आहे त्याचे दुरुस्तीकरण बाकी आहे.इतर वर्गामध्ये अजून बरेच धडे पूर्ण करायचे राहिले आहेत.त्या बद्दल प्रिन्सिपल माझी लेफ्ट राईट  करवून घेत आहे . रोज नवीन काही न काही काम निघत आहे. माझे स्वतः चे कामे अजून राहिली आहेत ते पूर्ण करायला वेळ मिळत नाही. तीन आठवड्या पूर्वी आमचे जुने हेड अमेरिके हून परत आले  तेव्हा पासून शाळा सुटल्या वर हि दोन दोन तीन तीन तास मीटिंग करत बसत आहे. काय करायचे काही सुचत नाही. हे झाले .. लगेच तीन दिवसा पूर्वी पूर्ण फेमिली गावाला गेली आहे. मग काय ? अहो.. घरातील सर्व ...म्हणजे सर्वच काम करावे लागत आहे. भांडी , कपडे , बाजार , पाणी भरणे पासून सर्व काही. असे वाटते ना कि लोक जगण्यासाठी काम करतात पण मी कामा साठी जगात आहे. नुसती कृत्रिम लाईफ झाली आहे. आजचा दिवसच विचित्र होता. आज गुगल वर सर्च करून साधी खिचडी कशी बनवतात ती कृती शोधली आणि कागदावर लिहून घेतली.बस त्या लिहिलेल्या कृती नुसार सुरवात केली. पण तांदूळ उकडत असतांना मला समझले नाही कि अजून किती पाणी ओतावे लागेल. चुकीने माझ्या ने जास्त पाणी टाकले गेले. दहा ते पंधरा मिनिटे ते जास्ती चे पाणी बाष्प बनून जात नाही तो पर्यंत वाट पाहिली. पाणी चे बाष्प तर झाले पण तेथे खिचडी च्या ऐवजी दुसराच कोणत्या तरी प्रकारचा पदार्थ तयार झाला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले "झाले कल्याण ....जाना था जापान पोहोच गये चीन" खिचडी च्या एवजी पिवळ्या रंगाचा चवदार गुंदर तयार झालेला दिसत होता !!. मला भीती हि वाटली कि बाबा आले तर नक्कीच बोलतील. मग आता काय पर्याय ? फेकू तर शकत नव्हतो. काय करायचे ? घराच्या बाहेर निघून गाय शोधू लागलो. म्हटले दिसली तर टाकून देणार. पण तेही दिसत नव्हती. तरी वाटले एकाद तासाने रोड वर ईकडे तिकडे फिरताना एखादी गाय तर नक्की दिसेल. दोन तास पसार झाले पण गाईचा काही पत्ता नाही. शेवटी पाच वाजता गाय दिसली तेव्हा ते गाई समोर ठेवले. तो पर्यंत मेगी वर टाइम पास केला.चांगलीच फजिती झाली आज. बघू ..उद्या जर आई लवकर परतली. तर परत अशी फजिती होणार नाही. नाही तर परत दुपारी मेगी आणि संध्याकाळी चाइनीस च्या स्टोल वर चाइनीस. पण एक गोष्ट लक्षात आली कि जेवण बनवणे म्हणजे काही तोंडाचा खेळ नव्हे.शाळेला उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्यात का आई कडून नक्कीच काही तरी बनवायचे शिकून  घ्यावयाचे आहे.  

1 टिप्पणी: