रविवार, ३० डिसेंबर, २०१२

बायको पाहिजे - भाग ३

indian-dulhan-in-dress
        मित्र पण  सांगतात - "यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणार...थांबव कि आता...एखादी पसंत  कर आणि लग्न कर ..कश्याला एवढे खोल वर विचारतो.". पण मला उत्तर न देणेच योग्य वाटते. शाळा नियमित सुरु झालेली आहे. मुलगी पाहण्यासाठी सुट्टी घेवून बाहेर गावी जाणे कमीत कमी मार्च ते एप्रिल पर्यंत शक्य नाही. तरी मध्येच  जर सतत दोन तीन दिवसाच्या सुट्या आल्यात कि आई घाई करते. थोड्या दिवसापूर्वी सुरत मधेच आणखी एका बी एड झालेल्या मुलीसाठी आमंत्रण आले. पण इथे पण तेच नाटक होते. मुलीचा बाप राजकारणी (नेता ) होता. जे मला अजिबात आवडत नाहीत. पण आई ने केलेल्या जोर जबरदस्ती मुले जावे लागले. मुलगी सुरत मधेच कुठे तरी शाळेत माध्यमिक विभागात खाजगी जोब वर होती.
     त्या स्थळी  एका नातेवाईक द्वारे जाण्याचे ठरले. मी, आई आणि एक नाते वाईक अशी तीन व्यक्ती तेथे गेलो. दुपारची वेळ होती. बहुतेक लोक झोपलेले असतात त्या वेळी. अश्या वेळी एका सोसायटी मध्ये घर शोधत शोधत आम्ही पोहचलो. जेम तेम ते घर सापडले. एरिया थोडा अंडर प्रोग्रेस होता. पुरेशी सोय अजून झालेली नव्हती.घराच्या बाहेर मुलीच्या वडिलाने मोठे  बेनर  लावले होते. ठळक अक्षरात  दुरून कोणाला हि दिसेल अश्या पद्धतीने एका राजकीय पक्षाचे आणि स्वत:चे  नाव लिहिले होते. ज्या प्रकारे ते बेनर लावले होते त्या वरून मी एकच अंदाज लावला कि या व्यक्तीला लवकरच एखादा मोठा नेता होण्याची घाई झालेली आहे. बाहेरून लोखंडी दरवाजा बंद होता.आम्ही बेल वाजली.मधून एक स्त्री आली व सस्मित आम्हास आत येण्यास आग्रह केला. दरवाजाच्या अगदी समोर सोफा सेट वर मुलीचा मावशीचा मुलगा उलटा (उताणा) होऊन झोपलेला होता.त्याची पेंट मागून अर्धी उतरलेली असून  "रूपा" ची अंडर विंयर दिसत होती. ते पाहून मला अमीर खान चा  गेल्या वर्षी आलेला चित्रपट  Delhi Belly आठवला. त्याच्यात एक केरेक्टर अगदी तसेच आहे. मुलीच्या आई ने त्यास तीन चार थाप मारून उठवले. कुंभ कर्णी निद्रेतून जागे होऊन तो सरळ किचन मध्ये गेला.मुलीच्या आई आणि माझ्या आई मध्ये संभाषण झाले. पण मी कोणाशीही बोलू शकत नव्हतो कारण माणसा पैकी एक हि हजर नव्हते. त्या च संदर्भात मी त्यांना (मुलीच्या आईला ) विचारले समोरून मला उत्तर मिळाले कि "आज इलेक्शन आहे त्यामुळे ते वार्ड (बूथ) वर गेलेले आहेत." हे ऐकून मला तर आश्चर्याचा धक्का बसला होता. एकच विचार मनात आला कि स्वत:च्या मुलीच्या लग्नाची गोष्ट निघालेली आहे आणि हा व्यक्ती घरी न थांबता बाहेर आहे. याचा अर्थ काय? कि त्याला कसली हि पडलेली नाही "राजकारण" शिवाय......

रविवार, ९ डिसेंबर, २०१२

बायको पाहिजे - भाग 2

indian-bride-in-jwellary
 
      मागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी  मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात "नंदुरबार" जिल्ह्यात गेलो असतांना मला झालेला अनुभव.या भागात आपण वाचणार सुरत शहराचा प्रसंग. गुजरात मध्ये एक वस्तू आढळून येते कि जर कोणी एखादा मराठी माणूस पोलीस खात्यात साधारण पोलीस कोन्स्तेबल जरी असला तरी  त्याचा ठसा वेगळा असतो तो जणू काही एखाद्या कमिशनर च्या पोस्ट वर आहे तसे त्याचे वर्तन समाजात असते.  बाकीच्या समाजात असते कि नाही ते मला माहित नाही पण , कमीत कमी बुद्धिस्ट कम्युनिटी मध्ये हामखास पणे दिसून येते. त्यांचा स्वभाव फारच विचित्र असतो. त्यांचा रग्गटपणा व्यवहारात आणि वर्तुनुकीमध्ये दिसून येतो. समजा रस्त्यावर एखादा "पवार" "सोनवणे" "बैसाणे" "चित्ते "  "रामटेके " "मोहिते " वगैरे पैकी जर कोणी पोलीस दिसून आला आणि जर तुम्ही प्रेमाने सस्मित त्याला राम राम किवा  "जयभिम" म्हटले, तर प्रत्युतर तुमच्या अपेक्षे प्रमाणे तुम्हास मिळणार नाही.त्यांना "राम राम" किवा  "जयभिम" म्हटल्यावर लगेच ते  चिडतील, त्यांना   त्याचे अपमान झाले असे वाटेल आणि रागात  ती व्यक्ती गुजराती मध्ये असे काही तर स्टेटमेन्ट देणार,  "चाल ओये,......आगळ चालतो था " किवा "तारी भेन नो तारी चाल ने निकळ ने"  हे सर्व मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पहिले आहे. त्यांच्या अश्या वागणुकीमुळे समाजात त्यांच्या पासून अमुक वर्ग दूरच राहतो . कारण त्यां वर्गाला वाटते कि गुजरात मध्ये बुद्धिस्ट कम्युनिटी चा पोलीस म्हणजे माणुसकी नसलेला व्यक्ती. आणि ती म्हण जी आहे ती खरी आहे कि "पुलिस वालो से दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी "... याचा अर्थ असा नाही कि ते समाजा पासून अलिप्त असतात. ते समाजात असतात पण दिसत नाहीत. वास्तविक पणे अमुक पोलिस वर्गाला मराठी असल्याचा अभिमान नसतो. अमुक नेहमी स्वतः ची ओळख लपविण्याचा प्रयत्न करत असतात.मला देखील त्यांचा पासून दूर राहणेच आवडते. संबंध जुळविण्यासाठी त्यांच्यात योग्य आणि व्यावहारिक व्यक्ती शोधणे म्हणजे कोळसाच्या खाणीत हिरा शोधण्या इतके अवघड असते 
     या दोन वर्ष दरम्यान बरीच स्थळे आलीत जिथे मुलीचे वडील , काका किवा मामा पोलीस खात्यात असतील पण मी त्यांना नकार दिला. गेल्या वर्षी गुजरात मधील वापी परिसरातून बी एड झालेल्या मुलीला मला नकार द्यावे लागले कारण एकच होते त्या मुलीच्या मामा चा जास्त  डाम-डीमपणा. वडील, मामा व काका पोलीस खात्यात होते. मुलगी चांगली होती. तिने बी एड केले होते आणि मी बी ए च्या शेवत्याच्या वर्षाची परीक्षा अटेंड करणार होतो. चर्चा करत असतांना मुलीचे वडील जे माझ्या समोर बसले होते एक हि शब्द बोलत नव्हते. जणू काही एखादा लोखंडी लॉक तोंडावर लावला असावा. पण तिचे मामा व काका सतत वट वट करत होते. त्यात मामा चे बोलणे मला खपले नाही ते मला लहान दाखवत बोलत होते "आमची मुलगी तुमच्या पेक्षा जास्त शिकली आहे ती बी एड झाली आहे , तुमच्या पेक्षा जास्त कमवणार , नोकरी तर लगेच लागेल." या ओळी मला ज्या रंगात त्यांनी सांगितले ते मला मुळीच आवडले नाही. मनात विचार आला कि हा व्यक्ती तर लग्न अजून झालेले नाही तोच एवढी वट वट करून धाक दाखवत आहे तो लग्न झाल्यावर कल्याण च करेल. म्हणून मुलगी मला पसंत असून हि "नकार" द्यावा लागला.