शुक्रवार, १६ मार्च, २०१२

परीक्षेत कोपी कितपत योग्यं ?

तीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्या ब्लोक मध्ये सुपर विजन ची जवाबदारी देण्यात आली होती त्या ब्लोक मध्ये तर अगदी आनंदाचे वातावरण होते. कारण आता पर्यंत सर्वच पेपर्स सोपे होते. पण जशी मुलांच्या हातात प्रश्नपत्रिका गेली तसे त्यांच्या चेहराचे हाव भाव बदलले. प्रत्येक जन चिंतातूर दिसत होते. कारण पेपर पाहिजे तेवढा सोपा नव्हता. मुले कॉपी करण्याचे प्रयत्न करू लागले. मी मात्र कोणत्या हि प्रकारे त्यांना कोपी करू देत नव्हते. काहींचे चेहरे तर रडके झाले होते. वाटत होते आताच रडून देतील कि काय ? पण ते म्हणतात ना चोरी करणार एन केन प्रकारे करूनच घेतो. तसे इथे घडले. तीन तास दरम्यान मला देखील काही पेपर वर्क करायचे होते. ते करताना जेव्हा हि टेबल वर जावून बसलो किवा उत्तर पत्रिकेत सही करण्यासाठी एखाद्या च्या बेच कडे गेलो कि पाठी मागे मुकाट्याने कोपी करायला सुरुवात होते असे. दोनदा एका मुलीला व मुलाला कोपी न करण्यासाठी टोचून बोललो. कार्यवाही करण्याची धमकी देखील दिली. फक्त दहा पंधरा मिनिटे शांत बसले असतील परत कोपी करण्याची त्यांची तळमळ सुरु होत असे. इथे एक नाही दोन नाही पण जवळ जवळ अर्धा क्लास,  वीस ते पंचवीस मुले उदास चेहरा ठेवून एक मेका कडे  मदतीच्या भावनेने पाहत होते. काही तर फारच दुखी दिसत होते.मनात आले आपण जरा जास्त कठोर झालो आहोत तसे करायला नको. पण कर्तव्य ते कर्तव्य असते ना. मी शेवट पर्यंत कोपी करू दिली नाही. ज्याला त्याला अधून मधून . माझी नझर चुकवून करता आली असेल तर केली असेल पण नझर समक्ष बिलकुल नाही. पेपर संपल्या वर एक मन म्हणत होते कि कमीत कमी पास होण्या इतकी कोपी करू द्यायला पाहिजे होती. दुसरे मन म्हणत होते कि मी योग्यच केले. बातमी पत्रात जेव्हा हि मुले मुलींचे आत्महत्येचे प्रकरण वाचले कि मला कधी कधी स्वतः वर संताप पण येतो कि माझ्या सारखेच शिक्षक या गोष्टीला जवाबदार असतील. तेव्हा अशी नोकरी करावीशी वाटत नाही.आणि एक विचार असा हि येतो कि यांना जर नुसत्या कोपी करवूनज जर पास व्हायचे असेल तर मग त्या शाळा कश्या साठी ? आणि ते तेजस्वी मुले जे उच्च क्रमांकासाठी  कोणत्या हि ट्युशन शिवाय रात्र दिवस मेहनत करतात त्यांच्या शी एव्हढा मोठा अन्याय ???? ? आई वडिलांच्या कष्टाचे पैसे मुले व मुलींनी का बरे उडवायचे ? फक्त परीक्षेलाच या कोपी करा आणि पास व्हा ..बरोबर ना ? फार विचित्र वाटते खोल वर विचार केला कि. आज बातमी पत्रात हरियाना राज्यात मुले कशी पराक्रम करतात बोर्डाच्या परीक्षेत चोरी करण्या साठी त्या संदर्भात बातमी वाचली आणि छायाचित्र पाहिलेत मला अस्श्चार्याचा धक्का लागला. ते छायाचित्र मी इथे पोस्ट करत आहे पाहाल..................
    





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा