शनिवार, २३ जून, २०१८

आज ( Nirjala Ekadashi ) निरजला एकादशी आहे

आज  कामावर मन लागत नव्हते कारण  एकच  कि आज  निरजला एकादशी  आहे. बहुसंख्य स्टॅफ अबसेन्ट होता. एकाला विचारले तेव्हा कळलं कि ते सर्व उपवास करणार म्हणून येणार नाही. मला नवल वाटले. मला काहीच माहित नव्हते म्हणून मी गुगल वर सर्च केले तेव्हा कळाले कि विष्णू ची भक्ती या दिवशी केली जाते व दान धर्म केला जातो. जग जरा विचित्र आहे. स्वतः ला मोक्ष प्राप्त करायचे आहे म्हणून उपवास करायचा व दान धर्म करायचा. एक प्रश्न पडतो जर भीम एकादशी नसती आली तर त्यांनी दान धर्म केला असता का ? नाही ना ? म्हणून सांगतो स्वार्था  शिवाय येथे मनुष्य काहीच करत नाही. उपवास जर करायचा असेल तर खऱ्या अर्थाने मनातील वाईट गोष्टीचा त्याग केला पाहिजे. दुसऱ्या बद्दल ची ईर्षा संपवली पाहिजे. मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार असतील तर त्यांचा त्याग करायला हवे. तर तो खरा उपवास. अन्यथा तुम्ही फक्त शरीराचे अन्न  पाणी एका दिवसा साठी बंद करून परमेश्वराला लुबाडण्या चा प्रयत्न करतात तो योग्य नाही. मला नाही माहीत कि किती लोक् माझ्या गोष्टी शी सहमत होतील. कदाचित वाचकांना राग देखील येईल. पण जे सांगतो ते खरे आहे. मंदिरात  दान पेटित टाकतात  किंवा ब्राह्मणानं दान दक्षिणा  कश्याला हो ? देवाला का पैसे हवेत ? आणि बाह्मणांना काही कमी आहे का  ? खरे दान करायचे असेल तर त्या रस्त्यावरील उपाशी असलेल्या भिकाऱ्याला अन्नाचे किंवा वस्त्राचे दान करा . आणि मग पहा , तुम्हाला मोक्ष कडे धाव घेण्याची गरज नाही , मोक्ष तुमच्या कडे येईल. कारण दानी  व पवित्र आत्म्यास मोक्ष प्राप्त होत असते. 

मंदिरात दान  करून नको दाखवू  कि तू किती मोठा दाणी 
अरे पैसा माझया पासून या जगात कारण मी पैश्याचा  धनी

काढून टाक अहंकार ,द्वेष व विषमतेचा विचार जो  आहे मनात
कारण राजा असो किंवा राणी संस्कारी असो किंवा अहंकारी सर्व गेलेत स्मशानातं  

सर्व वाचक गणास हार्दिक शुभेच्छा 

रविवार, ३० डिसेंबर, २०१२

बायको पाहिजे - भाग ३

indian-dulhan-in-dress
        मित्र पण  सांगतात - "यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणार...थांबव कि आता...एखादी पसंत  कर आणि लग्न कर ..कश्याला एवढे खोल वर विचारतो.". पण मला उत्तर न देणेच योग्य वाटते. शाळा नियमित सुरु झालेली आहे. मुलगी पाहण्यासाठी सुट्टी घेवून बाहेर गावी जाणे कमीत कमी मार्च ते एप्रिल पर्यंत शक्य नाही. तरी मध्येच  जर सतत दोन तीन दिवसाच्या सुट्या आल्यात कि आई घाई करते. थोड्या दिवसापूर्वी सुरत मधेच आणखी एका बी एड झालेल्या मुलीसाठी आमंत्रण आले. पण इथे पण तेच नाटक होते. मुलीचा बाप राजकारणी (नेता ) होता. जे मला अजिबात आवडत नाहीत. पण आई ने केलेल्या जोर जबरदस्ती मुले जावे लागले. मुलगी सुरत मधेच कुठे तरी शाळेत माध्यमिक विभागात खाजगी जोब वर होती.
     त्या स्थळी  एका नातेवाईक द्वारे जाण्याचे ठरले. मी, आई आणि एक नाते वाईक अशी तीन व्यक्ती तेथे गेलो. दुपारची वेळ होती. बहुतेक लोक झोपलेले असतात त्या वेळी. अश्या वेळी एका सोसायटी मध्ये घर शोधत शोधत आम्ही पोहचलो. जेम तेम ते घर सापडले. एरिया थोडा अंडर प्रोग्रेस होता. पुरेशी सोय अजून झालेली नव्हती.घराच्या बाहेर मुलीच्या वडिलाने मोठे  बेनर  लावले होते. ठळक अक्षरात  दुरून कोणाला हि दिसेल अश्या पद्धतीने एका राजकीय पक्षाचे आणि स्वत:चे  नाव लिहिले होते. ज्या प्रकारे ते बेनर लावले होते त्या वरून मी एकच अंदाज लावला कि या व्यक्तीला लवकरच एखादा मोठा नेता होण्याची घाई झालेली आहे. बाहेरून लोखंडी दरवाजा बंद होता.आम्ही बेल वाजली.मधून एक स्त्री आली व सस्मित आम्हास आत येण्यास आग्रह केला. दरवाजाच्या अगदी समोर सोफा सेट वर मुलीचा मावशीचा मुलगा उलटा (उताणा) होऊन झोपलेला होता.त्याची पेंट मागून अर्धी उतरलेली असून  "रूपा" ची अंडर विंयर दिसत होती. ते पाहून मला अमीर खान चा  गेल्या वर्षी आलेला चित्रपट  Delhi Belly आठवला. त्याच्यात एक केरेक्टर अगदी तसेच आहे. मुलीच्या आई ने त्यास तीन चार थाप मारून उठवले. कुंभ कर्णी निद्रेतून जागे होऊन तो सरळ किचन मध्ये गेला.मुलीच्या आई आणि माझ्या आई मध्ये संभाषण झाले. पण मी कोणाशीही बोलू शकत नव्हतो कारण माणसा पैकी एक हि हजर नव्हते. त्या च संदर्भात मी त्यांना (मुलीच्या आईला ) विचारले समोरून मला उत्तर मिळाले कि "आज इलेक्शन आहे त्यामुळे ते वार्ड (बूथ) वर गेलेले आहेत." हे ऐकून मला तर आश्चर्याचा धक्का बसला होता. एकच विचार मनात आला कि स्वत:च्या मुलीच्या लग्नाची गोष्ट निघालेली आहे आणि हा व्यक्ती घरी न थांबता बाहेर आहे. याचा अर्थ काय? कि त्याला कसली हि पडलेली नाही "राजकारण" शिवाय......

रविवार, ९ डिसेंबर, २०१२

बायको पाहिजे - भाग 2

indian-bride-in-jwellary
 
      मागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी  मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात "नंदुरबार" जिल्ह्यात गेलो असतांना मला झालेला अनुभव.या भागात आपण वाचणार सुरत शहराचा प्रसंग. गुजरात मध्ये एक वस्तू आढळून येते कि जर कोणी एखादा मराठी माणूस पोलीस खात्यात साधारण पोलीस कोन्स्तेबल जरी असला तरी  त्याचा ठसा वेगळा असतो तो जणू काही एखाद्या कमिशनर च्या पोस्ट वर आहे तसे त्याचे वर्तन समाजात असते.  बाकीच्या समाजात असते कि नाही ते मला माहित नाही पण , कमीत कमी बुद्धिस्ट कम्युनिटी मध्ये हामखास पणे दिसून येते. त्यांचा स्वभाव फारच विचित्र असतो. त्यांचा रग्गटपणा व्यवहारात आणि वर्तुनुकीमध्ये दिसून येतो. समजा रस्त्यावर एखादा "पवार" "सोनवणे" "बैसाणे" "चित्ते "  "रामटेके " "मोहिते " वगैरे पैकी जर कोणी पोलीस दिसून आला आणि जर तुम्ही प्रेमाने सस्मित त्याला राम राम किवा  "जयभिम" म्हटले, तर प्रत्युतर तुमच्या अपेक्षे प्रमाणे तुम्हास मिळणार नाही.त्यांना "राम राम" किवा  "जयभिम" म्हटल्यावर लगेच ते  चिडतील, त्यांना   त्याचे अपमान झाले असे वाटेल आणि रागात  ती व्यक्ती गुजराती मध्ये असे काही तर स्टेटमेन्ट देणार,  "चाल ओये,......आगळ चालतो था " किवा "तारी भेन नो तारी चाल ने निकळ ने"  हे सर्व मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पहिले आहे. त्यांच्या अश्या वागणुकीमुळे समाजात त्यांच्या पासून अमुक वर्ग दूरच राहतो . कारण त्यां वर्गाला वाटते कि गुजरात मध्ये बुद्धिस्ट कम्युनिटी चा पोलीस म्हणजे माणुसकी नसलेला व्यक्ती. आणि ती म्हण जी आहे ती खरी आहे कि "पुलिस वालो से दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी "... याचा अर्थ असा नाही कि ते समाजा पासून अलिप्त असतात. ते समाजात असतात पण दिसत नाहीत. वास्तविक पणे अमुक पोलिस वर्गाला मराठी असल्याचा अभिमान नसतो. अमुक नेहमी स्वतः ची ओळख लपविण्याचा प्रयत्न करत असतात.मला देखील त्यांचा पासून दूर राहणेच आवडते. संबंध जुळविण्यासाठी त्यांच्यात योग्य आणि व्यावहारिक व्यक्ती शोधणे म्हणजे कोळसाच्या खाणीत हिरा शोधण्या इतके अवघड असते 
     या दोन वर्ष दरम्यान बरीच स्थळे आलीत जिथे मुलीचे वडील , काका किवा मामा पोलीस खात्यात असतील पण मी त्यांना नकार दिला. गेल्या वर्षी गुजरात मधील वापी परिसरातून बी एड झालेल्या मुलीला मला नकार द्यावे लागले कारण एकच होते त्या मुलीच्या मामा चा जास्त  डाम-डीमपणा. वडील, मामा व काका पोलीस खात्यात होते. मुलगी चांगली होती. तिने बी एड केले होते आणि मी बी ए च्या शेवत्याच्या वर्षाची परीक्षा अटेंड करणार होतो. चर्चा करत असतांना मुलीचे वडील जे माझ्या समोर बसले होते एक हि शब्द बोलत नव्हते. जणू काही एखादा लोखंडी लॉक तोंडावर लावला असावा. पण तिचे मामा व काका सतत वट वट करत होते. त्यात मामा चे बोलणे मला खपले नाही ते मला लहान दाखवत बोलत होते "आमची मुलगी तुमच्या पेक्षा जास्त शिकली आहे ती बी एड झाली आहे , तुमच्या पेक्षा जास्त कमवणार , नोकरी तर लगेच लागेल." या ओळी मला ज्या रंगात त्यांनी सांगितले ते मला मुळीच आवडले नाही. मनात विचार आला कि हा व्यक्ती तर लग्न अजून झालेले नाही तोच एवढी वट वट करून धाक दाखवत आहे तो लग्न झाल्यावर कल्याण च करेल. म्हणून मुलगी मला पसंत असून हि "नकार" द्यावा लागला.

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

बायको पाहिजे - भाग 1

जुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, "लग्न केले कि नाही?" किवा "किती मुले आहेत तुम्हास ?". या प्रश्नाचे उत्तर देवून मी पण कंटाळलो आहे. किती वेळा परत परत तेच उत्तर देत राहायचे ? शेवटी नाईलाजाने मित्र वर्तुळा पासून दूर राहिलो आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसे पाहिजे तसे स्थळ मिळत नाही . आणि समजा मिळाले तर तिथे एक अथवा दोन कारणाशिवाय जमत नाही. एक तर मुलगी जास्त शहाणी असेल किवा आई वडील व नाते वाईक दीड शहाणे असतील. दोन वर्ष झाले आहे पण ज्या सुंदरी च्या शोधात आहे ती काही अजून काही मिळालेली नाही. मागे, मला झालेल्या अनुभवाची नोंद " सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे भाग एकदोन " मध्ये केली आहे. या वर्ष दरम्यान देखील मला नवीन अनुभव झाला.खानदेश भागात "नंदुरबार " म्हणून जिल्हा आहे. त्या ठिकाणी मुलगी पाहण्यासाठी गेलो होतो. मुलीने बारावी नंतर डी एम एल  टि केले होते आणि त्या बेस वर सरकारी हॉस्पिटल मध्ये जोब वर होती. अर्थात सरकारी नोकरी वर होती.जवळच्या नाते वाईकाने मला तिथे पाहण्यासाठी बोलावले.पण माझ्या मनात तर होतेच कि ते नक्की सरकारी नोकरीवाला नवरा शोधात असतील. म्हणून आपले जाणे योग्य नाही. मी टाळले. परत चार महिन्या नंतर दुसर्या नातेवाइका कडून त्याच मुली साठी बोलावाले गेले. मनातल्या मनात विचार आला कि मुलगी काही माझ्या कुंडळि  मधून जात नाही आहे. आपण नक्की गेले पाहिजे. माझ्या शाळेतील एका शिक्षक  मित्रा कडून माहिती मिळाली कि ते मुलगी च्या  वडिलाना ओळखतात. जेव्हा ते (मुलीचे वडील ) बस ड्राइवर होते तेव्हा ते नेहमी त्या शिक्षांना भेटत असत (त्यांचा कोलेज च्या रूट वर तीच एक बस होती ). व्यक्ती चांगले आहेत म्हणून आपण गेले पाहिजे असे मला वाटले. 
     नंदुबार ला आलो , त्या ठिकाणी सर्व प्रथम जुन्या विस्तारत जिथे ते राहत होते तिथे त्याचा विषयी माहिती गोळा केली. पण आश्चर्य !! कोणी हि मला त्यांच्या स्वभाव व वर्तणूक विषयी चांगले सांगितले नाही.पण तरी  माझ्या शिक्षक मित्राचे शब्द माझ्या लक्ष्यात होते. तेच डोक्यात ठेवून पुढे गेलो.
     बाजार पेठात त्यांचे दुमजली जुन्या टाईपचे घर होते , बाहेरून ते घर, माधव राव पेशवे यांच्या काळातले वाटत होते. घराची अवदशा पाहून वाटले नक्की यु एन ने त्या घराला इंडिअन हेरीटेज मध्ये सामील  करायला हवे.आत गेलो, बसलो, समोर च एकी कडे आई व दुसरी कडे बहिण बसली. मी एका पलंगावर बसलो. माझ्या डाव्या हाता कडे त्या दरवाज्यात  मुलीची आई उभी होती. आणि उजव्या हाता कडे वडील एका खुर्ची वर बसले होते.काल रात्री गली मध्ये लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून मुलगी थकलेली होती. त्यामुळे तिला तयार होवून चहा पाणी घेवून येण्यासाठी बराच वेळ लागला. तो पर्यंत मुलीचे वडील नाते वाईक विषयी एक दोन गोष्ट करू लागले. जवळ जवळ पंधरा मिनिटा नंतर  चहा आणि पाण्याचा ट्रे हातात घेवून मुलगी पांढर्या साडीत सुसज्ज होऊन आली. मुलेचे वय जवळ पास एकोणतीस ते तीस च्या जवळ पास होते पण मुलगी सुंदर होती त्यामुळे मी वय ईग्नोर केले..तिने प्रेमाने  मला , आई व बहिणीस चहा दिला. 
     दोघांनी एक दुसर्याचा परिचय करवून घेतला.नाव , गाव, शिक्षण,इच्छा वगैरे विषयी चर्चा झाली.  वीस मिनिटे  पसार झाली , पण मुलीची आई अजून काही बसलेली नव्हती.मुलीच्या मागे दरवाज्यात  उभीच राहिली. मला हे समजत नव्हते कि त्या मुलीच्या आईला बसायला काय झाले होते ?...अहो तब्बल वीस मिनिटा पासून जे काही गोष्टी होत होत्या त्यात ते उभे राहूनच हो कार आणि नकार देत त्यांचे मत मांडत होते. या चित्रा वरून तर एकच निष्कर्ष मला काढता आला कि येथे घरात मुलीच्या आईचे वर्चस्व आहे, वडील बिचारे नुसते औपचारिकता म्हणून असतील. पण पुढच्याच क्षणाला त्यांनी चांगल्याच पद्धतीने स्वतः चा परिचय करवून दिला.
     कारण समोरून अश्या काही स्टेटमेंटचा मारा त्यांनी केला कि मला तर फक्त ऐकतच राहावे लागले.
त्या पैकीचे काही विधाने या प्रमाणे होती.
"आमचे अमुक व्यक्ती (काका - मामा ) हे नाशिक शिक्षण बोर्डात अधिकारी आहेत "
     
"माझी मुलगी समग्र राज्यात अमुक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे."

"माझ्या मुलीला फोरेन मध्ये आमक्या गोष्टी साठी बोलावण्यात आलेले , पण आम्ही पाठवले नाही "

"औरंगाबाद हून एम बी ए झालेली व्यक्ती मुली साठी आली होती पण आम्हास आवडले नाही"

मंगळवार, २९ मे, २०१२

डोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............

दोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा माझा प्रथमच प्रसंग होता. म्हणून एक वेगळाच प्रकारचा उत्साह होता. जाण्या अगोदर तेथे गडावर कोणती सुविधा आहे व कोठे थांबता येईल ती जानकारी इंटरनेट वर शोधण्याचा प्रयत्न केला. सप्तशृंगी मातेची वेब साईट सापडली पण पाहिजे तशी माहिती उपलब्ध नव्हती.रात्री दोन वाजेला सुरत हून प्रवास प्रारंभ केला.आई वडील आणि मी तसेच सोबत काका आणि त्यांची चार मुले होती.सकाळ च्या सहा वाजे पर्यंत प्रवास सुरळीत पार पडला . पण जसे आम्ही गुजरात च्या डांग जिल्ह्यात पोहचलो. चार हि बहिणी नी उलटी (ओमिट ) करायला सुरवात केली. कारण रस्ता सर्पाकार आणि वळणदार होता. ते त्यांनी पाहिले कि त्रास सुरु होत असे. पण नाइलाज होता. कोणत्याही प्रकारची औषधे सोबत घेतली नव्हती. त्यामुळे तो त्रास सहन करूनच पुढे जावे लागले. गाडीच्या दोन्ही बाजूचे दरवाजे बाहेरून रंगले गेले होते. दरवाजा उघडण्याचे hendal देखील सुटले नव्हते. सापुतारा या ठिकाणी चहा घेण्याचे ठरवले. दिवस उगवण्याच्या तयारीत होता. तेथील ते थंड आणि अल्हाद दायक वातावरण शरीरात एक वेगळ्याच प्रकारचे रोमांच उभे करत होते. सुरत व गुजरातच्या इतर भागातून आलेले प्रवाशी त्या वातावरणाचा आनंद घेत होते. पर्वतामागून सूर्याचे अगदी नयनरम्य दुर्श्य दिसत होते. फोन मध्ये बिघाड झाल्या कारणाने ते दृष्य मी घेवून शकलो नाही.ढगामध्ये कधी लाल तर कधी तांबड्या रंगाचे किरण पसरत होते. तर कधी अचानक सूर्य मावडला असावा तसा भास होत होता. सूर्य जणू काही लपा छपी खेळत असावा असे वाटत होते.पुढे आम्ही सापुतारा हून कळवण या भागातून नांदोरी ला जाण्याचा मार्गावर निघालो.पर्वतावर ढग जणू काही आम्हास पाहत होते.
     पहाटेची वेळ होती. सकाळी कळवण या मार्गाने जात असतांना मधेच रोडवर कोंबडी , पिले अमुक वेळेस कुत्रे मध्ये येत होते. त्यांना वाचवत वाचवत चालकाने व्यवस्थित गाडी काढली. चालकाला भीती वाटत होती जर  चाका  खाली एखादी कोंबडी किवा पिलू आले म्हणजे गेली एखादी गांधीजींची नोट त्यामुळे त्याने अगदी काळजीपूर्वक त्या मार्गावर गाडी काढली. कळवण भाग संपला. पुढे त्या गडाच्या मार्गावर नांदोरी चेक पोस्ट लागले तेथे आम्ही सगळ्यांनी प्रवेशद्वार कडे दोन्ही हात जोडून नमन केले. आणि  आम्ही लागलो त्या पवित्र नांदोरी च्या वाटेवर. गोल गोल फिरून त्या डोंगरावर वाट काढायची होती. शिवाय रस्ता देखील थोडा रुंद आहे.वर जात असताना ढग जणूकाही डोंगराला आलिंगन घालत होते.  जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही सुखरूप पणे वर पोहचलो. गाडी पार्क करून तेथील धर्मशाळेत आंघोळी साठी व्यवस्था आहे कि नाही ते शोधू लागलोत. आश्चर्य !!! किती तरी धर्मशाळा आहेत. पण आंघोळी साठी सोय नव्हती. सर्व कळे पाण्याची बोंब. आजू बाजूला लौज वर आंघोळी साठी विचारले तर एका व्यक्ती चे ३० ते ४० रुपये आणि आम्ही जवळ पास आठ जन होतो. म्हणून आम्हास ते खर्चिक वाटले. पण न इलाज होता. शेवटी एका लौज वर सर्वांनी दोन रूम भाड्याने घेवून स्नान केले. मला तर वाटले कि स्नान केल्या शिवाय दर्शन केले तरी चालेल फक्त मन पाप पासून आणि वाईट विचार पासून एकदाचे धुतले पाहिजे. पण काकांनी स्नान करून जाण्याचा आग्रह केला.सर्व तयार झाले आणि निघाले मंदिराच्या दिशेने. 
आई ला पूजा अभिषेक साठी जे काही लागते ते विकत घेतले. पादत्राणे एका दुकानात ठेवले आणि निघालो सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. सर्व प्रथम काकांनी व भाऊ बहिणींनी ज्योत पहिल्या पायथ्याशी लावली. त्याच्या मागो माग मी देखील कपूर च्या वडीची ज्योत लावली. अश्या बर्याच पायर्यावर ज्योती लावल्यात. मधेच एका स्थळावर सोबत घेतलेले तेल, जे एका प्लास्टिक च्या पिशवीत होते ते वाहिले. ते तेल का वाहिले ते आज पर्यंत मला समजले नाही. मला वाटले एखादी पौराणिक कथा असेल त्या मागे त्याची नक्की खाली उतरल्यावर माहिती घेवू. पण दर्शन करून परत फिरल्यावर मला काही त्या बाबतीत विचारयाचे लक्ष्यात राहिले नाही. आता ते मला पुढे कधी प्रसंग जाण्याचा बनला तर माहित होईल. माझी प्रकृती ठीक नव्हती . शरीर अशक्त होते. पंधरा दिवसा पासून चा आजारी होतो. पाय उचलले जात नव्हते. पण जेम तेम मनात मातेचे नाव घेवून वर चढायला सुरुवात केली होती. पण मातेच्या कृपेने मला कोणतेही कष्ट जाणवले नाही आणि मी थेट वर मंदिरात जावून पोहचलो. सुदैवाने मातेची आरती व स्नान चालले होते. मला ते लाभले. मातेचे दुधाने स्नान केले जात होते. पण ते दुध खाली कुठे जात होते त्याचा काही मला पत्ता लागला नाही.नक्कीच चमत्कार म्हणावे लागेल. खाली उतरल्या नंतर दुकानावरून प्रसाद घेतला. आणि पादत्राणे घेवून लौज वर गेलोत. आप आपल्या बेग्स धरून गाडीत ठेवले आणि पुढे नाशिकला लग्न अटेंड करायचे असल्या कारणाने नाशिक मार्गावर निघालो.

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2

दोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे "सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे" या विषयावर चर्चा चालली होती. मला तर फारच विचित्र अनुभव झाले. अश्या ठिकाणी मुलगी पहावयास गेलो जिथे साधी बसण्यासाठी पण जागा व्यवस्थित नसेल. घराच्या पहिल्या द्वार पासून तर शेवटच्या द्वार पर्यंत नुसती धूळ उडतांना दिसते. कावळे एका खिडकीतून दुसर्या खिडकीद्वारे उडताना दिसायचे .... बसावेसे पण वाटत नाही. मुलगी जरी नुसती बारावी पास होती. पण मुलीचे पालक आणि नाते वाईक, जणू त्या मुलीने मोठाच पराक्रम केला असेल अशा पद्धतीने तिचा परिचय करून देतात. आणि त्या परिचय मध्ये पण मुलाला त्याचे हलक्या प्रकारचे स्टेटस आहे तसे दर्शवितात. आणि सरकारी नोकरी आहे का ? त्याच ओळीवर जास्त भर देतात.  अशा वेळेस मन तर फार वैतागले होते, मनात वाटायचे कुठे जंगला मध्ये मुलगी पहावयास येवून गेलो. या लोकांना बारावी च्या पुढे आणि सरकारी नोकरी शिवाय पण काही तरी असते ते माहीत आहे का ?. स्वतः वर संताप पण येत होता कि   येण्या अगोदर कमीत कमी चौकशी करायला हवी होती. माझा एक मित्र , विनोद जो कोल्हापूर ला आहे , बिचारा असाच कंटाडून गेला होता या सरकारी नोकरीच्या भूता मुळे , सर्व काही असून हि त्याला पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. नेहमी एकच प्रश्न समोर येत होता "सरकारी नोकरी आहे का?" जवळ जवळ एकाद वर्ष तो मुलीच्या शोधात होता. पण काही नाही. मग शेवटी त्याने ठरवले कि या सरकारी नोकरीच्या भुताला कसे हाताळायचे. तो सुरत मध्ये म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये कंत्राटी धोरणाने जल विभागात नोकरी वर लागला. सर्व काही त्याने प्लानिग नुसार केले. चार ते पाच महिन्यात त्याने खालचे वरचे जे कोणतेही अधिकारी असतात त्यांना खिस्यात केले. अर्थात पैस्याची लाच देवून त्यांना तयार केले. आणि परत एक वर्ष नंतर त्याच ठिकाणी गेला जिथे त्याला मुलगी आवडली होती. मोठ्या तोर्याने त्याने त्याचा काका आणि मामा बरोबर जावून मुलीच्या पालकाशी लग्नाची गोष्ट केली. या वेळेस मात्र सरकारी नोकरी माझ्या मित्राला असल्या कारणाने त्यांनी नकार दिला नाही(जी खरोखर नव्हती). त्यांनी सुरत म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये चौकशी केली. आणि त्यांना खरे वाटले. शेवटी  सासर्याने सर्व काही लग्नाचा खर्च केला कारण त्याला सरकारी नोकरीवाला नवरा मुलगी साठी पाहिजे होता आणि तो मिळाला देखील.दीड वर्ष तो सुरत मध्ये राहिला, पण त्याला भीती देखील वाटत होती कि जर मुलीच्या बापाला माहित झाले तो फ्रोड चा केस दाखल करेल. त्यामुळे त्याने लग्न झाले असून हि कोर्ट मेरीज केले. आणि लग्नाचे प्रमाणपत्र मिळवून घेतले.तेथे  सही करण्यासाठी माझे मित्र हजर राहिले होते. पण तसे काही झाले नाही जशी त्याला भीती होती. मुलगी सुखात होती. कोणतेही टेन्शन नव्हते. आणि बराबर दीड वर्ष नंतर तो कोल्हापूर परत स्वतः च्या घरी स्थायी झाला. सासर्यास माहित झाले. पण करणार काय  ?  त्याला मुलगी आनंदात दिसली. सर्व काही ठीक ठाक दिसले. शेवटी जी परिस्थिती होती ती त्याने मान्य केली. आज हि त्यांचा संसार सुखात चाललेला आहे. त्यांची लग्नाची एनिवर्सरी असली की त्या दिवशी ते आठवण करून मला फोन जरूर करतात. थोडक्यात, असे लोक पण सरकारी नोकरी चा भूत पळविण्यासाठी जवाबदार म्हणता येतील. हे गोविंदाच्या "कुली नंबर वन" नावाच्या चित्रपटात होते तसे झाले. पण प्रत्येकाचे तसे नशीब नसते. नाव त्याचे विनोद होते, पण त्याने गंभीर विनोद करून सुखद अंत आणला.  कित्येक मुलीचे पालक फसून हि जातात. डोळ्यावर सरकारी नोकरीचा लालचचा  काळा पट्टा असल्या कारणाने.  

रविवार, १५ एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे

स्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने नजीक बाहेर रोडवर असलेल्या चहा च्या स्टोल वर नेतात. आणि मुला सोबत असलेल्या नाते वाईकास मुलाचे नाव गाव , शिक्षण , पगार व राहण्या संबधित प्रश्न विचारतात .मुलीचा बाप सरकारी नोकरी च्या अपेक्षेत असतो. जेव्हा त्याला कळते कि मुलगा प्राइवेट जोब करतो तेव्हा विचारताना मुलगा एखादा गुन्हेगार असेल तसे हाव भाव चेहरावर दिसू लागतात.मुलाला सर्व काही विचारले जाते. सर्व काही अगदी व्यवस्थित आहे. मुलाला कोणते हि व्यसन नाही. स्वतः चे घर आहे ,रेगुलर जोब आहे, कोणाचाही एक पैशाचा कर्जबाजारी नाही. राहणीमान अगदी व्यवस्तीत आहे. त्या मुलीच्या बापाचे नसेल असे त्याचे घर आणि राहणीमान आहे. मधेच एक बहाणा करून ती व्यक्ती घरी फोन करून , दूर जावून काही तरी विचारते आणि मुलाला प्रत्युतर देते कि मुलगी तर आज पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यास गेली आहे. ती तुम्हास संध्याकाळी भेटेल. ते मुद्दाम तसे बोलतात कारण त्यांना माहित आहे समोर ची व्यक्ती फार लांबून आली आहे ते काही थांबणार नाही. अर्थात विषय तिथेच संपतो. असाच प्रकार माझा मित्र आणि माझ्या सोबत घडून गेला. मी चकितच झालो होतो कि समाजात एवढी निर्लज्ज लोक असतील कि ते कमीत कमी घरी चहा साठी बोलावून चर्चा करू शकत नाही. आणि रोडावर बसून एखाद्या स्टोल वर त्या संदर्भात चर्चा करतील. लोकांची मानसिकता आज पण बदलेली नाही. नव्या नियमानुसार सरकारी नोकरी वर कुठलाही पदावर किवा क्लास वन ऑफिसर जरी असेल त्याला देखील पूर्वी जे लाभ मिळत होते ते मिळत नाहीत. हो सुट्याच्या लाभ जरूर मिळतो. आणि दुसरा महत्वाचा फायदा असा कि सरकारी नोकरी वर आले म्हणजे बेफिकर होवून काम करणे. राजा पण आपला आणि प्रजा पण आपली. मग चालू द्यायचा कारभार आपल्या मर्जी नुसार. मला वाटते असे कोणाचे हि अपमान व्हायला नको त्या साठी. अश्या पालकांनी घरा बाहेर, कामाच्या ठिकाणी किवा जिथे ते लोकाना भेटतात  तिथे एक  पाटी लावली पाहिजे आणि त्यावर स्पष्ट  मोठ्या अक्षरात लिहिले पाहिजे "मुली साठी सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे". जेने करून त्यांना खोटे बोलावे लागणार नाही कि "मुलगी कलेक्टर ची परीक्षा देण्यास गेली आहे किवा पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यासाठी गेली आहे वगैरे" शिवाय या मुळे बराच वेळ वाचेल दोन्ही पक्षाचा. आणि अपमानास्पद तर मुळीच वाटणार नाही. खरे आहे ना ? मला वाटते समाजात दोन वर्ग पडतात . एक वर्ग असा असतो जो मुलीची वय निघून जाते, मुलगी चांगलीच वयस्कर होते पण सरकारी नोकरी वाला नवरा मुलीचा बापाला मिळत नाही तो पर्यंत तो तिचे लग्न करत नाही. येथे सहन करणे फक्त मुलीच्या नशिबात येते. अशा वेळेस टोमणे मारणारे बिचार्या त्या मुलीला प्रत्यक्ष किवा अप्रत्येक्ष रिते वयाच्या बाबतीत चर्चा करून टोमणे मारतात. तिची मानसिक अवस्था बिघडते. कोणतीही मुलगी समोर जावून आपल्या आई वडिलांना कधी हि सांगू शकत नाही कि माझे आता लग्न करा. ती फक्त सहन करू शकते. समाजात असे बरेच प्रकरण पहावयास मिळतात. मग शेवटी ..."बाबा पण गेले  नि दसम्या पण गेल्या". सरकारी नोकरी च्या भूता मुळे आलेली चांगली स्थळे पण ते गमावतात. आणि आबड धोबड ठिकाणी मुलीला देवून टाकतात. याचा परिणाम फक्त बिचारी ती मुलगी भोगते. हा झाला एक वर्ग आणि दुसरा वर्ग जे मोजके आणि व्यावहारिक असतील. ते म्हणतात ना "लोहा गरम है मार दो हातोडा"  तसे त्यांचे असते योग्य स्थळ आणि माणसे दिसली म्हणजे मुलीची पसंत नापसंत विचारतील आणि मग लग्न साठी पुढे येतील. 
चला शिर्डी जाण्याचा प्लान आहे तिकीट बुक करण्यासाठी लवकर जावे लागेल.बाकी चर्चा पुढच्या भागात...