शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2

दोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे "सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे" या विषयावर चर्चा चालली होती. मला तर फारच विचित्र अनुभव झाले. अश्या ठिकाणी मुलगी पहावयास गेलो जिथे साधी बसण्यासाठी पण जागा व्यवस्थित नसेल. घराच्या पहिल्या द्वार पासून तर शेवटच्या द्वार पर्यंत नुसती धूळ उडतांना दिसते. कावळे एका खिडकीतून दुसर्या खिडकीद्वारे उडताना दिसायचे .... बसावेसे पण वाटत नाही. मुलगी जरी नुसती बारावी पास होती. पण मुलीचे पालक आणि नाते वाईक, जणू त्या मुलीने मोठाच पराक्रम केला असेल अशा पद्धतीने तिचा परिचय करून देतात. आणि त्या परिचय मध्ये पण मुलाला त्याचे हलक्या प्रकारचे स्टेटस आहे तसे दर्शवितात. आणि सरकारी नोकरी आहे का ? त्याच ओळीवर जास्त भर देतात.  अशा वेळेस मन तर फार वैतागले होते, मनात वाटायचे कुठे जंगला मध्ये मुलगी पहावयास येवून गेलो. या लोकांना बारावी च्या पुढे आणि सरकारी नोकरी शिवाय पण काही तरी असते ते माहीत आहे का ?. स्वतः वर संताप पण येत होता कि   येण्या अगोदर कमीत कमी चौकशी करायला हवी होती. माझा एक मित्र , विनोद जो कोल्हापूर ला आहे , बिचारा असाच कंटाडून गेला होता या सरकारी नोकरीच्या भूता मुळे , सर्व काही असून हि त्याला पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. नेहमी एकच प्रश्न समोर येत होता "सरकारी नोकरी आहे का?" जवळ जवळ एकाद वर्ष तो मुलीच्या शोधात होता. पण काही नाही. मग शेवटी त्याने ठरवले कि या सरकारी नोकरीच्या भुताला कसे हाताळायचे. तो सुरत मध्ये म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये कंत्राटी धोरणाने जल विभागात नोकरी वर लागला. सर्व काही त्याने प्लानिग नुसार केले. चार ते पाच महिन्यात त्याने खालचे वरचे जे कोणतेही अधिकारी असतात त्यांना खिस्यात केले. अर्थात पैस्याची लाच देवून त्यांना तयार केले. आणि परत एक वर्ष नंतर त्याच ठिकाणी गेला जिथे त्याला मुलगी आवडली होती. मोठ्या तोर्याने त्याने त्याचा काका आणि मामा बरोबर जावून मुलीच्या पालकाशी लग्नाची गोष्ट केली. या वेळेस मात्र सरकारी नोकरी माझ्या मित्राला असल्या कारणाने त्यांनी नकार दिला नाही(जी खरोखर नव्हती). त्यांनी सुरत म्युनिसिपल कोर्पोरेशन  मध्ये चौकशी केली. आणि त्यांना खरे वाटले. शेवटी  सासर्याने सर्व काही लग्नाचा खर्च केला कारण त्याला सरकारी नोकरीवाला नवरा मुलगी साठी पाहिजे होता आणि तो मिळाला देखील.दीड वर्ष तो सुरत मध्ये राहिला, पण त्याला भीती देखील वाटत होती कि जर मुलीच्या बापाला माहित झाले तो फ्रोड चा केस दाखल करेल. त्यामुळे त्याने लग्न झाले असून हि कोर्ट मेरीज केले. आणि लग्नाचे प्रमाणपत्र मिळवून घेतले.तेथे  सही करण्यासाठी माझे मित्र हजर राहिले होते. पण तसे काही झाले नाही जशी त्याला भीती होती. मुलगी सुखात होती. कोणतेही टेन्शन नव्हते. आणि बराबर दीड वर्ष नंतर तो कोल्हापूर परत स्वतः च्या घरी स्थायी झाला. सासर्यास माहित झाले. पण करणार काय  ?  त्याला मुलगी आनंदात दिसली. सर्व काही ठीक ठाक दिसले. शेवटी जी परिस्थिती होती ती त्याने मान्य केली. आज हि त्यांचा संसार सुखात चाललेला आहे. त्यांची लग्नाची एनिवर्सरी असली की त्या दिवशी ते आठवण करून मला फोन जरूर करतात. थोडक्यात, असे लोक पण सरकारी नोकरी चा भूत पळविण्यासाठी जवाबदार म्हणता येतील. हे गोविंदाच्या "कुली नंबर वन" नावाच्या चित्रपटात होते तसे झाले. पण प्रत्येकाचे तसे नशीब नसते. नाव त्याचे विनोद होते, पण त्याने गंभीर विनोद करून सुखद अंत आणला.  कित्येक मुलीचे पालक फसून हि जातात. डोळ्यावर सरकारी नोकरीचा लालचचा  काळा पट्टा असल्या कारणाने.  

रविवार, १५ एप्रिल, २०१२

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे

स्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने नजीक बाहेर रोडवर असलेल्या चहा च्या स्टोल वर नेतात. आणि मुला सोबत असलेल्या नाते वाईकास मुलाचे नाव गाव , शिक्षण , पगार व राहण्या संबधित प्रश्न विचारतात .मुलीचा बाप सरकारी नोकरी च्या अपेक्षेत असतो. जेव्हा त्याला कळते कि मुलगा प्राइवेट जोब करतो तेव्हा विचारताना मुलगा एखादा गुन्हेगार असेल तसे हाव भाव चेहरावर दिसू लागतात.मुलाला सर्व काही विचारले जाते. सर्व काही अगदी व्यवस्थित आहे. मुलाला कोणते हि व्यसन नाही. स्वतः चे घर आहे ,रेगुलर जोब आहे, कोणाचाही एक पैशाचा कर्जबाजारी नाही. राहणीमान अगदी व्यवस्तीत आहे. त्या मुलीच्या बापाचे नसेल असे त्याचे घर आणि राहणीमान आहे. मधेच एक बहाणा करून ती व्यक्ती घरी फोन करून , दूर जावून काही तरी विचारते आणि मुलाला प्रत्युतर देते कि मुलगी तर आज पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यास गेली आहे. ती तुम्हास संध्याकाळी भेटेल. ते मुद्दाम तसे बोलतात कारण त्यांना माहित आहे समोर ची व्यक्ती फार लांबून आली आहे ते काही थांबणार नाही. अर्थात विषय तिथेच संपतो. असाच प्रकार माझा मित्र आणि माझ्या सोबत घडून गेला. मी चकितच झालो होतो कि समाजात एवढी निर्लज्ज लोक असतील कि ते कमीत कमी घरी चहा साठी बोलावून चर्चा करू शकत नाही. आणि रोडावर बसून एखाद्या स्टोल वर त्या संदर्भात चर्चा करतील. लोकांची मानसिकता आज पण बदलेली नाही. नव्या नियमानुसार सरकारी नोकरी वर कुठलाही पदावर किवा क्लास वन ऑफिसर जरी असेल त्याला देखील पूर्वी जे लाभ मिळत होते ते मिळत नाहीत. हो सुट्याच्या लाभ जरूर मिळतो. आणि दुसरा महत्वाचा फायदा असा कि सरकारी नोकरी वर आले म्हणजे बेफिकर होवून काम करणे. राजा पण आपला आणि प्रजा पण आपली. मग चालू द्यायचा कारभार आपल्या मर्जी नुसार. मला वाटते असे कोणाचे हि अपमान व्हायला नको त्या साठी. अश्या पालकांनी घरा बाहेर, कामाच्या ठिकाणी किवा जिथे ते लोकाना भेटतात  तिथे एक  पाटी लावली पाहिजे आणि त्यावर स्पष्ट  मोठ्या अक्षरात लिहिले पाहिजे "मुली साठी सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे". जेने करून त्यांना खोटे बोलावे लागणार नाही कि "मुलगी कलेक्टर ची परीक्षा देण्यास गेली आहे किवा पोलीस भर्ती ची परीक्षा देण्यासाठी गेली आहे वगैरे" शिवाय या मुळे बराच वेळ वाचेल दोन्ही पक्षाचा. आणि अपमानास्पद तर मुळीच वाटणार नाही. खरे आहे ना ? मला वाटते समाजात दोन वर्ग पडतात . एक वर्ग असा असतो जो मुलीची वय निघून जाते, मुलगी चांगलीच वयस्कर होते पण सरकारी नोकरी वाला नवरा मुलीचा बापाला मिळत नाही तो पर्यंत तो तिचे लग्न करत नाही. येथे सहन करणे फक्त मुलीच्या नशिबात येते. अशा वेळेस टोमणे मारणारे बिचार्या त्या मुलीला प्रत्यक्ष किवा अप्रत्येक्ष रिते वयाच्या बाबतीत चर्चा करून टोमणे मारतात. तिची मानसिक अवस्था बिघडते. कोणतीही मुलगी समोर जावून आपल्या आई वडिलांना कधी हि सांगू शकत नाही कि माझे आता लग्न करा. ती फक्त सहन करू शकते. समाजात असे बरेच प्रकरण पहावयास मिळतात. मग शेवटी ..."बाबा पण गेले  नि दसम्या पण गेल्या". सरकारी नोकरी च्या भूता मुळे आलेली चांगली स्थळे पण ते गमावतात. आणि आबड धोबड ठिकाणी मुलीला देवून टाकतात. याचा परिणाम फक्त बिचारी ती मुलगी भोगते. हा झाला एक वर्ग आणि दुसरा वर्ग जे मोजके आणि व्यावहारिक असतील. ते म्हणतात ना "लोहा गरम है मार दो हातोडा"  तसे त्यांचे असते योग्य स्थळ आणि माणसे दिसली म्हणजे मुलीची पसंत नापसंत विचारतील आणि मग लग्न साठी पुढे येतील. 
चला शिर्डी जाण्याचा प्लान आहे तिकीट बुक करण्यासाठी लवकर जावे लागेल.बाकी चर्चा पुढच्या भागात...